twitter




आयुष्य खूप सुंदर आहे
पण त्याला जगता आलं पाहिजे
फुल खुंटन्याआधी त्यालाही मन आहे
हे जाणता आलं पाहिजे !!

दुःखाची बेरीज सगळेच करतात
पण दुःखात ही हसता आलं पाहिजे
सुखात ही सगळेच हसतात
पण दुसर्याच सुखही आपलंच मानता आलं पाहिजे !!

जीवनाच्या वाटेवर खूप माणस मिळतात
माणसात माणूस शोधता आलं पाहिजे
अनेक नाती जोडता जोडता जीवनभर
मैत्रीचं, प्रेमाचं अतूट नात जपता आलं पाहिजे !!

आयुष्य खूप सुंदर आहे
आयुष्य खूप सुंदर आहे
बघायला गेलं तर
दु:खातही सुख आहे
जगायला गेलं तर

अश्रूंतही एक समाधान आहे
वाटायला गेलं तर

समाधानातही चिंता आहे
जपायला गेलं तर

काट्यांतही मखमल आहे
सोसायला गेलं तर

फुलां कडूनही जख्म आहे
कुस्करायला गेलं तर

अपयशातही नवी आशा आहे
पचवायला गेलं तर

यश खूपच क्षणिक आहे
उमजायला गेलं तर

मातीतच खरं सोनं आहे
शरीर श्रमाने माखल्यावर

रत्नांची शेवटी मातीच होते
फुलांनी शरीर झाकल्यावर

निखाऱ्यांवर चालावं लागतं
कापसावर उतानी पडल्यावर

वेदनांशी स्पर्धा करावी लागते
हास्य चेहऱ्या मागे दडल्यावर

कल्पना शक्तीचं प्रगती आहे
विज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर

प्रगतीच विनाशाचं कारण आहे
इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर


"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहे
विचारात गीतासार साठवला तर

उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते
सुर्यपुत्र कर्ण आठवला तर....

खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं
त्या भाग्यवंतांचं ठीक आहे

उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पण
अगणित उत्तरांचं पीक आहे.

आयुष्य खूप सुंदर आहे
आयुष्य खूप सुंदर आहे
बघायला गेलं तर
दु:खातही सुख आहे
जगायला गेलं तर !!


एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला.
दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत
तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो.
काहीतरी दुसरे घेऊन बाहेर पडतो आपण.
परतताना मनात विचार येतो
‘तो ड्रेस घ्यायला हवा होता''

सिग्नलला गाडी थांबते,
चिमुरडी काच ठोठावते.
गोड हसते, पण भिक मागत आहे
हे लक्षात घेऊन त्या हसण्याकडे
फार लक्ष देत नाही आपण.
२-३ रुपये द्यावे असे मनात येते.
रेंगाळत सुटे शोधता शोधता
‘देऊ का नको’ हा धावा मनात सुरू असतो.
तेवढ्यात सिग्नल सुटतो,
गाडी पुढे घ्यायची वेळ येते.
थोडे पुढे गेल्यावर मन म्हणते,
‘सुटे होते समोर, द्यायला हवे होते त्या चिमुरडीला'

जेवणाच्या सुट्टीत ऑफिसातला मित्र
त्याच्या घरातला त्रास फार विश्वासाने सांगतो,
त्याच्या डोळ्यात व्यथांचे ढग दाटलेले दिसतात.
वाईट वाटते खूप, नशीब आपण त्या परिस्थितीत
नाही असेही मनोमनी पुटपुटून आपण मोकळेहोतो.
‘काही मदत हवी का?’ असे विचारायचे असूनही
आपण गप्प राहतो."
जेवणाची सुट्टी संपते.
तो त्याच्या आणि आपण आपल्या कामाला लागतो.
क्षणभर स्वत:वर राग येतो, ‘मदत तर विचारली नाही'
निदान खांद्यावर सहानुभूतीचा हात तरी ठेवायला हवा होता मी!’

असेच होते नेहमी,
छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात.
खरं तर या छोट्या गोष्टीच
जगण्याचे कारण असतात.

गेलेले क्षण परत येत नाहीत,
राहतो तो ‘खेद’,
करता येण्यासारख्या गोष्टी न केल्याचा.

जगण्याची साधने जमवताना
जगणेच राहून जात नाहीयेना
ते ‘चेक’ करा.

"आनंद झाला तर हसा,
वाईट वाटले तर डोळ्यांना
बांध घालू नका"

चांगल्या गोष्टीची दाद द्या,
आवडले नाही तर सांगा,
घुसमटू नका."

त्या त्या क्षणी जे योग्य वाटते ते करा.
नंतर त्यावर विचार करून काहीच साध्य नाही.

आयुष्यातल्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या,
त्या छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात
गुंफणे म्हणजेच जगणे."

आवडलेल्या गाण्यावर मान नाही डुलली
तर ‘लाईफ’ कसले?

आपल्यांच्या दु:खात डोळे नाही भरले
तर ‘लाईफ’ कसले?

मित्रांच्या फालतू विनोदांवर
पोट दुखेस्तोवर हसलो नाही
तर ‘लाईफ’ कसले?

आनंदात आनंद आणि
दु:खात दु:ख नाही जाणवले
तर ‘लाईफ’ कसले?


या आयुष्याचे काही खास नियम आहेत, अगदी कुठलाही अपवाद  नसलेले. अंबानी पासून तर अगदी रस्त्यावरच्या एखाद्या भिकाऱ्या पर्यंत सगळ्यांनाच ते लागू होतात- अगदी कोणीही त्याला अपवाद नाही.वय वाढत  तसं शरीर थकत जातं, पण केवळ  इच्छा शक्तीच्या जोरावर काही लोकं  निसर्गाला आव्हान देत वाढत्या वयाकडे पाठ फिरवण्याचे प्रयत्न करतात, पण ते काही फार काळ जमत नाही. कधी तरी एक दिवस येतो आणि मग शरीर आणि मन एकमेकांपासून फारकत घेतं, आणि मग शस्त्रक्रिया, किंवा औषधोपचार करून शरीर जगवावं लागतं.

शरीर आणि मन यांचं द्वंद्व सुरु झालं की यात नेहेमी मनाचा विजय होतो, आणि  शरीर खचतं. मन लपवून ठेवता येतं पण शरीर तर नाही ना लपवून ठेवता येत? मला वाटतं की हेच ते कारण असावं की ,काही ठरावीक वयात आपण थोडं जास्त अंतर्मुख होतो, आणि मग इतरांशी न बोलता  आपलं मन हे स्वतःशीच  जास्त बोलायला लागतं – हे होतं तुम्ही एकटे असतांना, आणि  त्याच वेळेस तुमचे मन मागे वळून भूतकाळात डोकावत असतं.
भूतकाळात डॊकावुन पाहिल्यावर कधी तरी सुंदर स्वप्न दिसतात, तेंव्हा तो भूतकाळ तर खूप आवडतो. अगदी शाळेतले मित्र मैत्रिणी, लग्नापूर्वी बायको बरोबर ( ती बायको  नसतांना ) बरोबर चोरून फिरल्याचे दिवस , ह्या आनंददायक आठवणी, तर कधी तरी आपण कोणाशी कसे वाईट वागलो होतो ते पण आठवत. कुठल्यातरी गोष्टीचा मनात एक विनाकारण   आकस ठेवून आपण ’ तसे ’ का वागलो हे भूतकाळात  डोकावून तिऱ्हाइताच्या दृष्टीने पाहिले की स्वतःची चूक समजते, आणि प्रसंगी स्वतःचीच लाज पण वाटते.आज ती वेळ गेलेली आहे, आणि आपण ज्या व्यक्तीशी तसे वागलो ती व्यक्ती आपल्यात नाही, आणि  अगदी मनापासून क्षमा मागायची इच्छा होत असली , तरी पण  आता ते शक्य नाही,  हे लक्षात आलं की वाईट वाटतं.  आपल्याला तसे वागायचा खरंच अधिकार होता का?  ह्याचं उत्तर स्वतःलाच सांगितल्यावर, आणि आपल्या वागण्याची खंत वाटते आणि डोळ्यात पाणी येतंच.

आपण कधी काळी केलेल्या चुकांकडे पाठ फिरवून दुर्लक्ष केल्याचा आपला प्रयत्न, आपली चूक असतांना पण इतरांवर आपण जास्तच ऑफेन्सिव्ह’ होऊन केलेले आरोप- म्हणजे स्वतःचा कमकुवतपणा लपविण्याचा तो प्रयत्न नव्हता का? होय! स्वतः वरच्या केल्या गेलेल्या खऱ्या आरोपांना उत्तर द्यावे लागू नये म्हणून समोरच्या व्यक्तीवर केले निरर्थक बिनबुडाचे आरोप  करून त्या व्यक्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची माझी स्ट्रॅटेजी खरंच योग्य नव्हती, आणि त्या मुळे मी समोरच्या अतिशय जवळच्या व्यक्तीला खूप मानसिक त्रास दिलाय याची जाणीव पण होते, आणि आपण तसे का वागलो याचे आश्चर्य पण वाटते.

आयुष्यात नाते संबंध झिडकारणे सगळ्यात सोपे,  आणि  जेंव्हा तुम्ही ते झिडकारत, तेंव्हा स्वतःबद्दल उगाच काही तरी अवास्तव कल्पना करून घेतलेल्या असतात आपण. आज वयाची काही वर्ष संपली आहेत, उरलेल्या वर्षांबद्दल  कसे जातील याची काळजी वाटत ही असतेच. आपण जसे वागलो, तसेच जर आपल्याशी आज कोणी वागले तर?? हा प्रश्न तर मेंदूला नेहेमीच कुरतडत असतो.

शेवटी काय तर, वेळ कधीच पुन्हा मागे नेता येत नाही, घड्याळाचे काटे पण कधीच थांबवता येत नाहीत, स्वतःच्या कर्तबगारीवर तुम्ही पैसे कमावून आपलं भवितव्य घडवतो आहे असा विचार करू शकतो,  पण  के्वळ पैसे कमावणे म्हणजे भवितव्य घडवणे नाही.भूतकाळातील एकही क्षण ( तुम्ही मिस केलेले ) त्याला पुन्हा अनुभवायला मिळत नाही – हा एक शाप आहे, आणि याच शापाचे ओझे अश्वत्थाम्याच्या डोक्यावरच्या जखमे प्रमाणे सांभाळत आमची पिढी ही आयुष्य जगते आहे.

जन्माला येतांना डॊळ्यात घेऊन येणाऱ्या अश्रु घेऊन आपण या जगात येतो, वयोमाना प्रमाणॆ शरीराच्या अवयवांनी जरी आपली साथ सोडली, किंवा एके काळी जवळच्या असलेल्या लोकांनी , किंवा जगातल्या  सगळ्या आप्तेष्टांनी जरी साथ सोडली, तरी दैवाने दिलेले ते सोबती म्हणजे अश्रू मात्र आपली साथ अगदी इमाने इतबारे करत असतात. ते केवळ अश्रूच आहेत की तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मनातल्या भावनांचा निचरा होण्यास मदत करतात, आणि मग पुन्हा नवीन आव्हानं पेलण्यास मनाला तयार करतात.  म्हणून आपली खरी संपत्ती म्हणजे अश्रू- कधीच न संपणारी!

हे असे विचार का मनात यावे? मला एकच सांगायचंय, जर कोणाची क्षमा मागायची असेल तर योग्य वेळ कुठली??अगदी आजची वेळ योग्य आहे, अजिबात वेळ करू नका, आणि क्षमा मागून मोकळॆ व्हा.


 An effective Social Networking Strategy is one that can make excellent effect for the brand on the internet. We have seen companies go social in their marketing methods as a result of the growth of internet users and social media especially in the last few years. No matter the Social networking strategy such a brand decides to use, if it does not create an excellent effect for the brand, then it is simply not effective. For more information visit : http://seoservicesprovider101.wordpress.com/2013/07/11/the-effective-social-networking-smo-strategy/



एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही.कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही...... त्या उडणार्‍या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत."

वपुंच्या वपूर्झा मधील ह्या ओळी वाचल्या अन् मन भुर्रकन काही वर्षे मागे गेलं...आणि सारं सारं बालपण आठवलं.


लाटेने कि काळाने नेला तो किनार्‍यावरचा वाळूचा किल्ला?
भोवर्‍याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला...
हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची वही,
इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही....
गेले कुठे ते चालताना "पॅकपॅक" आवाज करणारे पायातले बूट?
"मी नाही देणार जा माझं चॉकलेट" म्हणत आवळलेली ती घट्ट मुठ....
किती जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत?
ब्लँकेटहून जास्त उब होती त्या मायेच्या कुशीत...
हरवला तो प्रेमाचा घास...."चिऊताई" दाखवत आईने भरवलेला...
घरात न सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन ठरवलेला?
गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीचे केस?
छोट्याशा बुटांची आईने बांधलेली ती सुटलेली लेस....
गेली कुठे ती मामाच्या गावी जाणारी झुकझुक गाडी?
हरवली कुठे ती क्रिसमस मधली झिंगलमॅनची पांढरी दाढी?
धावत धावत ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला?
शाळेत बडबड गीते गाताना एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?
झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला?
अ आ इ ई पाठीवर लिहिणारा तो खडू कुणी पळवला?
कशाला आलं हे आपल्याला शहाणपण????
हरवलं त्यात ते सुंदर बालपण.......



खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना? आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण निसटुन गेल्यावरच प्रकर्षाने होते. पण बालपणीच्या काही आठवणी, मनाच्या कोपर्‍यात अजुनही दाटलेल्या असतात, त्यांना हलकेच गोंजारल असता त्यांची सय अधिकच गडद होते. आपलं मनही किती विचित्र असतं ना. जेंव्हा लहान असतो तेंव्हा पटकन मोठे व्हावेसे वाटते. शाळा सोडुन बाबांसारखे ऑफिसला जावेसे वाटते तर दादासारखे कॉलेजला जावंस वाटतं. मुलींनाही आईसारखी साडी नेसुन स्वयंपाक करायला आणि ताईसारखा नट्टापट्टा करायला आवडतं. मात्र आता मोठे झाल्यावर पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात आणि नकळत डोळ्यात पाणी येतं.


पाखरे जर दिवस असते
आभाळी मी सोडिले नसते
फिरूनी त्यांना ह्रदयात मी
कोंडुन ठेविले असते
ते पाखरू मागे न वळले
मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना
जे परतुन कधी ना आले...

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा : Vijay Gaikwad



अस्वस्थ हिंदुस्तान आणि करोडो हिंदुस्तानी...! हवाय एक विचार जसा चीन कडे आहे :- 

हिंदुस्तानी मीडिया किवा सरकारने सर्व हिंदुस्तंनिवासीयना एक गोड स्वप्न दाखवला होत, की हिंदुस्तान एक सुपर पावर होणार. पण सध्याची परिस्थिति बघून मला तरी नाही वाटत आपण त्या मार्गाने चाललो आहे! आशिया खंडामधून चीन आणि हिंदुस्तान ह्या दोन देशामध्ये कोण सुपर पावर बनणार हयाकडे पूर्ण जगाचे लक्षं वेधले आहे. सांगायला दुख होत आहे क
ी चीन आपल्यापासून खूप पुढे गेला आहे हे खूप उदाहरणावरून सांगता येईल..ओलांपिक, आर्मी, टेक्नॉलजी, शिक्षण, आरोग्य अशा कितीतरी बाबतील चीन नक्कीच पुढे आहे! आपण अजूनही कश्मीर साठीच लढतो आहे!

आज 65 वर्षांनंतर स्वातंत्र्यदिन साजरा करताना दहशतवाद, स्वैराचार, भ्रष्टाचार, बॉम्बस्फोट या साऱ्या भीतीदायक विचारांचा मनात कल्लोळ उठतो. देश खोकला होत चाललाय हे अनेक उदाहरण देऊन मी स्पष्ट करू शकतो- टीव्ही वर बातम्या बघायला गेलो की फक्त बाबा रामदेव , अण्णा ह्यांची आंदोलने किवा कुठेतरी -तोडफोड, आतंकी हमला, भ्रष्टाचाराच्या बातम्या. स्वातंत्र्याला इतकी वर्षे झाल्यानंतरही ही अवस्था असावी ही जाणीव खिन्न आणि उद्विग्न करणारी आहे. आथिर्क व लष्करीदृष्ट्या सार्मथ्यवान असलेला आपला भारत देश…..;

दहशतवाद, भ्रष्टाचार, जातिभेद ह्या सर्व मगरमिठीतून कधी मुक्तहोणार…..?भारत-पाकिस्तान-काश्मीर हा तिढा सुटणार कधी? गरिबांना पोट भरून 2 वेळच जेवण कधी भेटणार?? आपल्या देशात जन्म घेतलेल्या बाळाला साला सकस आहार नाही भेटू शकत किवा एखाद्या शिक्षित मुलाला रोजगार नाही देऊ शकत? काय पाप केलाय - की अजूनही महिला असुरक्षित आहेत?? का आपले वैज्ञानिक बाहेरील देशात नोकरीला जातात?? ई, बंगलोर, चेन्नई , गोवा ई मेट्रो शहरांमध्ये परिस्थिति त्यामानाने ठीक आहे - पण जी राज्य देशाच्या बॉर्डरवर आहात त्यांना जीवन नको झालाय? निर्दोष शेकडो लोक असेच मरत आहेत - त्याबरोबर त्यांची स्वप्न ही मारून जातात - हे सर्व कधी थांबणार?

राजकारण्यांना आता फक्त स्वतची झोळी भरणे सोडून देशाचा विचार केला पाहिजे. निर्दोष सैनिक रोज मरत आहेत - आपल्या सैनिकाला अजूनही जुन्या बंदुकाचा पुरवठा केला जातो, तिकडे शत्रू आधुनिक शस्त्रे घेऊन वार करत आहे. आपल्या सैनिकांकडे हिम्मत शत्रूपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे पण आधुनिक शस्त्रांचा अभाव, आधुनिक टेक्नॉलजीचा अभाव ह्यामुळे असे मौल्यवान सच्चे देशप्रेमी आपण गमवत आहे! काडीचीही देशभक्ती नसणार्‍या राजकारण्यांना कधी समजणार आपल्या मौल्यवान लोकांचा जीव, त्यांची हिम्मत, त्यांची बहादुरी?? आपल्याकडे एक-से बडकर लोक आहेत - पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केला जात. इग्रज जाता-जाता खूप मोठी राजकीय खेळी खेळला आहे - आणि त्याला हातभार म्हणून आपले राजकारणी विविध गटांमध्ये राजकारण खेळत आहेत. आणि ह्याचा परिणाम पूर्ण देश भोगत आहे.. आपलाच मित्र आपलाच वैरी वाटू लागला आहे - असा कसं हे घाणेरडा राजकारण??

खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र होणार कधी - कधी होणार हिंदुस्तान सुपर पावर…..?

माझ्या मते तरी भ्रष्टाचार, दहशतवाद आणि जातिभेद यासारख्या अनेक प्रश्नांच्या मगरमिठीतून मुक्त झाल्यावरच खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला असे म्हणता येईल. जोपर्यंत राजकारण्यांचे नानाविध अघोरी खेळ, चाली, कट संपत नाहीत तोपर्यंत आपण पारतंत्र्यातच राहणार. ज्या दिवशी भ्रष्टाचार, जातिभेद आणि दहशतवादाला आळा बसेल तोच खरा स्वातंत्रदिन आणि तेव्हाच आपण सुपर पावर होऊ.

आपण रंगवलेल्या या नव्या स्वतंत्र भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी तरुण पिढीची आहे आणि ते ध्येय तरुण पिढीने बाळगले पाहिजे आणि माझ्या मते आपल्या सर्वांत ते बळ आहे. देशावर प्रेम करा - आणि एकतेला माना - एकते मध्ये खूप ताकत असते..!!

आपला मित्र, 

Vijay Gaikwad

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा : Vijay Gaikwad   


Had a lousy morning? Things looking grim?
Not to worry. The rest of your day need not be a disaster. It can in fact become one of your best, providing you take these simple steps:

 
1. Remember that the past does not equal the future.
There is no such thing as a "run of bad luck." The reason people believe such nonsense is that the human brain creates patterns out of random events and remembers the events that fit the pattern.

2. Refuse to make self-fulfilling prophesies. 
If you believe the rest of your day will be as challenging as what's already happened, then rest assured: You'll end up doing something (or saying) something that will make sure that your prediction comes true.

3. Get a sense of proportion.
Think about the big picture: Unless something life-changing has happened (like the death of a loved one), chances are that in two weeks, you'll have forgotten completely about whatever it was that has your shorts in a twist today.

4. Change your threshold for "good" and "bad."
Decide that a good day is any day that you're above ground. Similarly, decide that a bad day is when somebody steals your car and drives it into the ocean. Those types of definitions make it easy to be happy–and difficult to be sad.

5. Improve your body chemistry.
Your body and brain are in a feedback loop: A bad mood makes you tired, which makes your mood worse, and so forth. Interrupt the pattern by getting up and moving around.  Take a walk or eat something healthy.

6. Focus on what's going well.
The primary reason you're convinced it's a bad day is that you're focusing on whatever went wrong. However, for everything going badly, there are probably dozens of things going well.  Make list, and post it where it's visible.

7. Expect something wondrous.
Just as an attitude of doom and gloom makes you see more problems, facing the future with a sense of wonder makes you alive to all sorts of wonderful things that are going on, right now, everywhere around you.
For more information please visit : Vijay Gaikwad