twitter



एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही.कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही...... त्या उडणार्‍या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत."

वपुंच्या वपूर्झा मधील ह्या ओळी वाचल्या अन् मन भुर्रकन काही वर्षे मागे गेलं...आणि सारं सारं बालपण आठवलं.


लाटेने कि काळाने नेला तो किनार्‍यावरचा वाळूचा किल्ला?
भोवर्‍याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला...
हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची वही,
इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही....
गेले कुठे ते चालताना "पॅकपॅक" आवाज करणारे पायातले बूट?
"मी नाही देणार जा माझं चॉकलेट" म्हणत आवळलेली ती घट्ट मुठ....
किती जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत?
ब्लँकेटहून जास्त उब होती त्या मायेच्या कुशीत...
हरवला तो प्रेमाचा घास...."चिऊताई" दाखवत आईने भरवलेला...
घरात न सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन ठरवलेला?
गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीचे केस?
छोट्याशा बुटांची आईने बांधलेली ती सुटलेली लेस....
गेली कुठे ती मामाच्या गावी जाणारी झुकझुक गाडी?
हरवली कुठे ती क्रिसमस मधली झिंगलमॅनची पांढरी दाढी?
धावत धावत ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला?
शाळेत बडबड गीते गाताना एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?
झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला?
अ आ इ ई पाठीवर लिहिणारा तो खडू कुणी पळवला?
कशाला आलं हे आपल्याला शहाणपण????
हरवलं त्यात ते सुंदर बालपण.......



खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना? आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण निसटुन गेल्यावरच प्रकर्षाने होते. पण बालपणीच्या काही आठवणी, मनाच्या कोपर्‍यात अजुनही दाटलेल्या असतात, त्यांना हलकेच गोंजारल असता त्यांची सय अधिकच गडद होते. आपलं मनही किती विचित्र असतं ना. जेंव्हा लहान असतो तेंव्हा पटकन मोठे व्हावेसे वाटते. शाळा सोडुन बाबांसारखे ऑफिसला जावेसे वाटते तर दादासारखे कॉलेजला जावंस वाटतं. मुलींनाही आईसारखी साडी नेसुन स्वयंपाक करायला आणि ताईसारखा नट्टापट्टा करायला आवडतं. मात्र आता मोठे झाल्यावर पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात आणि नकळत डोळ्यात पाणी येतं.


पाखरे जर दिवस असते
आभाळी मी सोडिले नसते
फिरूनी त्यांना ह्रदयात मी
कोंडुन ठेविले असते
ते पाखरू मागे न वळले
मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना
जे परतुन कधी ना आले...

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा : Vijay Gaikwad



अस्वस्थ हिंदुस्तान आणि करोडो हिंदुस्तानी...! हवाय एक विचार जसा चीन कडे आहे :- 

हिंदुस्तानी मीडिया किवा सरकारने सर्व हिंदुस्तंनिवासीयना एक गोड स्वप्न दाखवला होत, की हिंदुस्तान एक सुपर पावर होणार. पण सध्याची परिस्थिति बघून मला तरी नाही वाटत आपण त्या मार्गाने चाललो आहे! आशिया खंडामधून चीन आणि हिंदुस्तान ह्या दोन देशामध्ये कोण सुपर पावर बनणार हयाकडे पूर्ण जगाचे लक्षं वेधले आहे. सांगायला दुख होत आहे क
ी चीन आपल्यापासून खूप पुढे गेला आहे हे खूप उदाहरणावरून सांगता येईल..ओलांपिक, आर्मी, टेक्नॉलजी, शिक्षण, आरोग्य अशा कितीतरी बाबतील चीन नक्कीच पुढे आहे! आपण अजूनही कश्मीर साठीच लढतो आहे!

आज 65 वर्षांनंतर स्वातंत्र्यदिन साजरा करताना दहशतवाद, स्वैराचार, भ्रष्टाचार, बॉम्बस्फोट या साऱ्या भीतीदायक विचारांचा मनात कल्लोळ उठतो. देश खोकला होत चाललाय हे अनेक उदाहरण देऊन मी स्पष्ट करू शकतो- टीव्ही वर बातम्या बघायला गेलो की फक्त बाबा रामदेव , अण्णा ह्यांची आंदोलने किवा कुठेतरी -तोडफोड, आतंकी हमला, भ्रष्टाचाराच्या बातम्या. स्वातंत्र्याला इतकी वर्षे झाल्यानंतरही ही अवस्था असावी ही जाणीव खिन्न आणि उद्विग्न करणारी आहे. आथिर्क व लष्करीदृष्ट्या सार्मथ्यवान असलेला आपला भारत देश…..;

दहशतवाद, भ्रष्टाचार, जातिभेद ह्या सर्व मगरमिठीतून कधी मुक्तहोणार…..?भारत-पाकिस्तान-काश्मीर हा तिढा सुटणार कधी? गरिबांना पोट भरून 2 वेळच जेवण कधी भेटणार?? आपल्या देशात जन्म घेतलेल्या बाळाला साला सकस आहार नाही भेटू शकत किवा एखाद्या शिक्षित मुलाला रोजगार नाही देऊ शकत? काय पाप केलाय - की अजूनही महिला असुरक्षित आहेत?? का आपले वैज्ञानिक बाहेरील देशात नोकरीला जातात?? ई, बंगलोर, चेन्नई , गोवा ई मेट्रो शहरांमध्ये परिस्थिति त्यामानाने ठीक आहे - पण जी राज्य देशाच्या बॉर्डरवर आहात त्यांना जीवन नको झालाय? निर्दोष शेकडो लोक असेच मरत आहेत - त्याबरोबर त्यांची स्वप्न ही मारून जातात - हे सर्व कधी थांबणार?

राजकारण्यांना आता फक्त स्वतची झोळी भरणे सोडून देशाचा विचार केला पाहिजे. निर्दोष सैनिक रोज मरत आहेत - आपल्या सैनिकाला अजूनही जुन्या बंदुकाचा पुरवठा केला जातो, तिकडे शत्रू आधुनिक शस्त्रे घेऊन वार करत आहे. आपल्या सैनिकांकडे हिम्मत शत्रूपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे पण आधुनिक शस्त्रांचा अभाव, आधुनिक टेक्नॉलजीचा अभाव ह्यामुळे असे मौल्यवान सच्चे देशप्रेमी आपण गमवत आहे! काडीचीही देशभक्ती नसणार्‍या राजकारण्यांना कधी समजणार आपल्या मौल्यवान लोकांचा जीव, त्यांची हिम्मत, त्यांची बहादुरी?? आपल्याकडे एक-से बडकर लोक आहेत - पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केला जात. इग्रज जाता-जाता खूप मोठी राजकीय खेळी खेळला आहे - आणि त्याला हातभार म्हणून आपले राजकारणी विविध गटांमध्ये राजकारण खेळत आहेत. आणि ह्याचा परिणाम पूर्ण देश भोगत आहे.. आपलाच मित्र आपलाच वैरी वाटू लागला आहे - असा कसं हे घाणेरडा राजकारण??

खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र होणार कधी - कधी होणार हिंदुस्तान सुपर पावर…..?

माझ्या मते तरी भ्रष्टाचार, दहशतवाद आणि जातिभेद यासारख्या अनेक प्रश्नांच्या मगरमिठीतून मुक्त झाल्यावरच खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला असे म्हणता येईल. जोपर्यंत राजकारण्यांचे नानाविध अघोरी खेळ, चाली, कट संपत नाहीत तोपर्यंत आपण पारतंत्र्यातच राहणार. ज्या दिवशी भ्रष्टाचार, जातिभेद आणि दहशतवादाला आळा बसेल तोच खरा स्वातंत्रदिन आणि तेव्हाच आपण सुपर पावर होऊ.

आपण रंगवलेल्या या नव्या स्वतंत्र भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी तरुण पिढीची आहे आणि ते ध्येय तरुण पिढीने बाळगले पाहिजे आणि माझ्या मते आपल्या सर्वांत ते बळ आहे. देशावर प्रेम करा - आणि एकतेला माना - एकते मध्ये खूप ताकत असते..!!

आपला मित्र, 

Vijay Gaikwad

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा : Vijay Gaikwad   


Had a lousy morning? Things looking grim?
Not to worry. The rest of your day need not be a disaster. It can in fact become one of your best, providing you take these simple steps:

 
1. Remember that the past does not equal the future.
There is no such thing as a "run of bad luck." The reason people believe such nonsense is that the human brain creates patterns out of random events and remembers the events that fit the pattern.

2. Refuse to make self-fulfilling prophesies. 
If you believe the rest of your day will be as challenging as what's already happened, then rest assured: You'll end up doing something (or saying) something that will make sure that your prediction comes true.

3. Get a sense of proportion.
Think about the big picture: Unless something life-changing has happened (like the death of a loved one), chances are that in two weeks, you'll have forgotten completely about whatever it was that has your shorts in a twist today.

4. Change your threshold for "good" and "bad."
Decide that a good day is any day that you're above ground. Similarly, decide that a bad day is when somebody steals your car and drives it into the ocean. Those types of definitions make it easy to be happy–and difficult to be sad.

5. Improve your body chemistry.
Your body and brain are in a feedback loop: A bad mood makes you tired, which makes your mood worse, and so forth. Interrupt the pattern by getting up and moving around.  Take a walk or eat something healthy.

6. Focus on what's going well.
The primary reason you're convinced it's a bad day is that you're focusing on whatever went wrong. However, for everything going badly, there are probably dozens of things going well.  Make list, and post it where it's visible.

7. Expect something wondrous.
Just as an attitude of doom and gloom makes you see more problems, facing the future with a sense of wonder makes you alive to all sorts of wonderful things that are going on, right now, everywhere around you.
For more information please visit : Vijay Gaikwad


Mornings are a great time for getting things done. You’re less likely to be interrupted than you are later in the day. Your supply of willpower is fresh after a good night’s sleep. That makes it possible to turn personal priorities like exercise or strategic thinking into reality.

But if you’ve got big goals--and a chaotic a.m. schedule--how can you make over your mornings to make these goals happen?



Because I write about time management frequently, I’ve gotten to see hundreds of calendars and schedules over the years. From studying people’s morning habits, I’ve learned that getting the most out of this time is a five-part process. Follow these steps, though, and you’re on your way to building morning habits that stick.

1. Track Your Time

Part of spending your time better is knowing how you’re spending it now. If you’ve ever tried to lose weight, you know that nutritionists tell you to keep a food journal because it keeps you from eating mindlessly. It’s the same with time. Write down what you’re doing as often as you can. Use my spreadsheet, a Word document, or a pad and pen.

While measuring your mornings, try tracking your whole week. The reason? The solution to morning dilemmas often lies at other times of the day. You may be too tired because you’re staying up late. But if you look at how you’re spending your nights, you’ll notice that you’re not doing anything urgent. The Daily Show can be recorded and watched earlier--possibly while you’re on the treadmill at 6:30 a.m.

As for the mornings themselves, you can be organized but still not be spending them well. Question your assumptions. You may believe that “a man who wants to keep his job gets into the office before his boss” because that’s what your father did, but your boss may be disappointed that he doesn’t get the place to himself for an hour first! If you decide that something is a top priority, do it, but understand that we have to do few things in life.

2. Picture the Perfect Morning

After you know how you’re spending your time, ask yourself what a great morning would look like. For me, it would start with a run, followed by a hearty family breakfast. After getting people out the door, I’d focus on long-term projects like my books. Here are some other ideas for morning enrichment:

For personal growth:

    Read through a religious text: Sacred texts can teach us about human nature and history, even if they’re not from a religion you subscribe to. If they are, pray or meditate and get to know your beliefs in a deeper way.
    Train for something big: Aiming to complete a half-marathon, a triathlon, or a long bike ride will keep you inspired as you take your fitness to the next level.
    Do art projects with your kids:. Mornings don’t have to be a death march out the door. Enjoy your time with your little ones at a time of day when you all have more patience.

For professional growth:

    Strategize: In an age of constant connectivity, people complain of having no time to think. Use your mornings to picture what you want your career and organization to look like in the future.
    Read articles in professional journals: Benefit from other people’s research and strategic thinking, and gain new insights into your field.
    Take an online class: If a job or career change is in your future, a self-paced class can keep your skills sharp.

3. Think Through the Logistics

How could this vision mesh with the life you have? Don’t assume you have to add it on top of the hours you already spend getting ready or that you’ll have to get to work earlier. If you fill the morning hours with important activities you’ll crowd out things that are more time intensive than they need to be. Map out a morning schedule. What time would you have to get up and what time do you need to go to bed to get enough sleep? As for the mornings themselves, what would make your ritual easier? Do you need to set your easel next to your bed? Can you find a more cheerful alarm clock or one you can’t turn off so easily?

It’s easy to believe our own excuses, particularly if they’re good ones. Come up with a plan and assemble what you need, but whatever you do, don’t label this vision as impossible

4. Build the Habit

This is the most important step. Turning a desire into a ritual requires willpower. Use these fives steps to optimize your routine:

    Start slowly: Go to bed and wake up fifteen minutes earlier for a few days until this new schedule seems doable.
    Monitor your energy: Building a new habit takes effort, so take care of yourself while you’re trying. Eat right, eat enough, and surround yourself with supportive people who want to see you succeed.
    Choose one new habit at a time to introduce: If you want to run, pray, and write in a journal, choose one of these and make it a habit before adding another.
    Chart your progress: Habits take weeks to establish, so keep track of how you’re doing for at least thirty days. Once skipping a session feels like you forgot something--like forgetting to brush your teeth--you can take your ritual up a notch.
    Feel free to use bribery: Eventually habits produce their own motivation, but until then, external motivations like promising yourself concert tickets can keep you moving forward. And keep in mind that your morning rituals shouldn’t be of the self-flagellation variety. Choose things you enjoy: your before-breakfast ritual has the potential to become your favorite part of the day.

5. Tune Up as Necessary

Life changes. Sometimes we have to regroup, but the goal is to replace any rituals that no longer work with new ones that make you feel like every day is full of possibility.

That is ultimately the amazing thing about mornings--they always feel like a new chance to do things right. A win scored then creates a cascade of success. The hopeful hours before most people eat breakfast are too precious to be blown on semiconscious activities. You can do a lot with those hours. Whenever I’m tempted to say I don’t have time for something, I remind myself that if I wanted to get up early, I could. These hours are available to all of us if we choose to use them.

So how would you like to use your mornings? This important question requires careful thinking. But once you decide, small rituals can accomplish great things. When you make over your mornings, you can make over your life. That is what the most successful people know. For more information visit on : Vijay Gaikwad


माईचा जन्म १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७; वर्धा, महाराष्ट्र येथे झाला. माई मुळच्या विदर्भातल्या. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरं वळायचं काम करायचे. गाव अतिशय मागासलेलं. शहरी सुविधांचा स्पर्श नाही, कुणाला शिक्षणाचा गंध नाही, अशीच सगळी परिस्थिती. चिंधी (सिंधू) ही सर्वांत मोठी मुलगी. पाठी एक भाऊ, एक बहीण. त्या पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील त्यांना घेऊन पिंपरीमधी गावात आले. मुलीनं शिकावं अशी वडलांची इच्छा. पण आईचा मात्र सक्त विरोध. मग ते माईंना गुरं राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. माई मुळच्याच बुद्धिमान, पण जेमेतेम मराठी चौथीपर्यंत शिकता आलं.

अल्पवयातचत्यांचा विवाह वयाच्या ९व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न झाला.आणि चिंधी साठेची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. लग्नात माईंचं वय होतं अकरा वर्षं आणि नवर्‍याचं वय तीस वर्षं. घरी प्रचंड सासूरवास. ढोरासारखी मेहनत करावी लागे. घरात सगळे पुस्तकद्वेष्टे. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बीळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अक्षरांवरून आधाशासारख्या नजर फिरवायच्या.


अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. त्या सांगतात,"तेव्हा गुरं वळणं हाच व्यवसाय असायचा. गुरंही शेकड्यांनी असायची. त्यांचं शेण काढता काढता कंबरडं मोडायचं. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणार्‍यांना मजुरी पण शेण काढणार्‍यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथं मी बंड पुकारलं. लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली."

माई हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली होती, आणि अडाणी गावकर्‍यांना नवीन नेतृत्व मिळालं होतं. गावकरी डोईजड होण्याची शक्यता होती. माईंच्या पोटातील मूल आपलं असल्याचा प्रचार मग दमडाजीनं सुरू केला. नवर्‍याच्या मनात माईंच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला, आणि पूर्ण दिवस भरलेल्या माईंना त्यानं बेदम मारून घराबाहेर काढलं. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकलं. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली.
नवर्‍यानं हाकलल्यानंतर गावकर्‍यांनीही हाकललं. माराने अर्धमेल्या झालेल्या माई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनंही पाठ फिरवली.

दोन घासांसाठी भीक मागण्याची वेळ माईंवर आली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वेस्टेशनवर त्या भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेलं एखादं फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वेरुळांच्या कडेनं फिरायच्या. एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण 'लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल' म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणं सुरू झालं. त्या गायच्या,

ये ऊन किती कडक तापते
बाई अंगाची फुटते लाही
दोन दिसाचा शिळा तुकडा वाढा
चालेल आम्हा वाढा
दार नका लावू
पुन्हा येणार नाही..


माई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथेही त्यांनी कधी एकटं खाल्लं नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकार्‍यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच माईंना संरक्षण दिले. माईंभोवती ते रिंगण घालून झोपायचे. २१ वर्षांच्या होत्या माई तेव्हा. पण एक दिवस हे संरक्षणही संपले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नाही. त्यांच्याबरोबर जेवणारे भिकारी त्यांच्यापासून दूर झाल्याचं त्यांना जाणवलं आणि लक्षात आलं की तिथे कायम राहता येणार नाही. वाट फुटेल तिथे माई चालत राहिल्या. आश्रय कुठेच मिळाला नाही. उघड्यावर तर रात्री झोपणं शक्य नव्हतं, म्हणून माईंनी स्मशान गाठलं.

त्या स्मशानातच राहू लागल्या. पण पोटातल्या भुकेचं काय? एक मृतदेह आला. अंत्यसंस्कार झाले. मडकं फुटलं. पण मडक्यात थोडं पाणी तसंच होतं. अंत्यविधी करून लोक निघाले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे मागे आशेने चालू लागल्या. एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना थोडं पीठ आणि सव्वा रुपया दिला. भिन्न काळोख दाटला होता. चिता अजून धगधगत होती आणि माईंच्या पोटात भूक इतकी पेटली होती की 'दगड चावता आला असता तर दगडही चावून खाल्ला असता.' माईंनी मडक्यातल्या पाण्यात पीठ कालवले, आणि चितेवरच्या निखार्‍यावर भाजले. कडक भाकरी तशीच खाल्ली.

माई काही दिवसांनी तिथूनही बाहेर पडल्या, आणि भीक मागत, काम शोधत चिखलदर्‍याला पोहोचल्या. तिथे रस्ताबांधणीला सुरुवात झाली होती. स्थानिक आदिवासी आणि मध्य प्रदेशातील मजूर तिथे काम करत होते. कंत्राटदाराने माईंना कामावर ठेवण्यास नकार दिला. सकाळ-संध्याकाळ कुटकी (भात), डाळ आणि आठवड्यातून एकदा ताक, या बोलीवर माईंनी तिथल्या मजुरांची मुलं सांभाळण्यास सुरुवात केली. चिखलदर्‍याचं काम संपल्यावर हे मजूर पुण्याला आले, आणि माई त्यांच्याबरोबर निघाल्या.

एकदा असंच पुण्यात कुठेसं रस्त्यावर माईंना एक मुलगा रडत बसलेला दिसला. आपलं नाव 'दिपक गायकवाड' एवढंच त्या मुलाला सांगता येत होतं. आसपासच्या लोकांनाही काहीच माहिती नव्हती. त्या मुलाला घेऊन माई पोलीस स्टेशनात गेल्या तर पोलीसांनी माईंना हाकलून लावलं. माईंनी आठवडा पोलीस स्टेशनबाहेर बसून काढला पण पोलीसांनी तक्रारही नोंदवून घेतली नाही. माईंनीच मग त्या मुलाचा सांभाळ करायचं ठरवलं. पुढे महिनाभरात अशीच २-३ मुलं त्यंना रस्त्यावर भीक मागताना भेटली, आणि माईंनी त्यांनाही आपल्या पदराखाली घेतलं. निराश्रिताचं जगणं किती भयंकर असतं ते त्यांनी अनुभवलं होतं. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये, हे त्यांची इच्छा होती. या मुलांमुळे आपल्याही जगण्याला काही अर्थ मिळेल, असं त्यांना वाटलं. पण या मुलांचा सांभाळ करायला पैसा कुठून आणायचा? स्वतःचंच पोट तिथे भरलं जात नव्हतं, आणि आता जोडीला ४ मुलं होती. आणि त्या मुलांनी भीक मागणं माईंना मंजूर नव्हतं.

त्यावेळी भारत-रशिया मैत्री करारावर पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात सह्या होणार होत्या. या ऐतिहासिक करारासाठी मोठा समारंभ योजला होता. कडेकोट बंदोबस्त होता. माईंच्या लक्षात आलं की आपण इथे व्यासपीठावर जाऊन दोन शब्द जर बोलू शकलो तर इथे जमलेल्या हजारो प्रेक्षकांच्या मनांत आपण जागा करू शकू आणि मग आपल्या संकटातून मार्ग निघू शकेल. त्यंनी हळूच सभागृहात प्रवेश केला. झाडूवाली असेल म्हणून कोणीच त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. व्यासपीठावर एक काश्मिरी माणूस आपल्या व्यथा सांगत होता. तो भाषण संपवून खाली उतरताच माईंनी थेट व्यासपीठावरच उडी घेतली. दुसरा वक्ता अजून उठायचा होता. त्याआधी माईंनी सरळ माईक धरला आणि भाषण सुरू केलं. त्यांचा खणखणीत आवाज आणि कविता ऐकून सगळे स्तब्ध झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला, आणि माईंना जे हवं होतं ते मिळालं. आता त्यांना मदत नक्कीच मिळणार होती.

कार्यक्रम संपला आणि श्री. सुनील दत्त समोर आले. त्यांनी माईंशी हस्तांदोलनच केले. माई थक्क झाल्या. सर्वजण माईंचं कौतुक करत होते, पण त्यांचं तिकडे लक्ष नव्हतं. त्यांना भूक लागली होती. शेवटी त्यांनी हळूच विचारलं, 'खाना है क्या?' कार्यक्रमानंतर आमंत्रितांसाठी बडा खाना मांडलेलाच होता. माई गेल्या आणि त्यांनी पूर्ण ताट भरून अन्न घेतलं. तिथेच जमिनीवर बसून जेवू लागल्या. एवढं ताटभर अन्न त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं होतं.

त्या जेवत असतानाच दगडूशेठ हलवाई मंदिर समितीचे तात्यासाहेब गोडसे तिथे आले आणि त्यांची विचारपूस केली. तात्यासाहेबांनी माईंच्या मुलीला, ममताला, सांभाळण्याची तयारी दाखवली, आणि ममता पुण्याच्या सेवासदनमध्ये दाखल झाली. त्याच कार्यक्रमात आकाशवाणीचे यशवंत खरातही होते. माईंचा खडा आवाज त्यांनी ऐकला होताच. त्यांनी माईंना आकाशवाणीवर कार्यक्रम करायला माईंना आमंत्रण दिलं. त्या मुलांना बरोबर घेऊन मुंबईला निघाल्या. पण स्वतःच्या मुलीला माईंनी दुसर्‍यांना सांभाळायला का दिलं?

माई सांगतात, "रस्त्यावर बेवारस सोडलेली मुलं माझ्याकडे सांभाळायला होती. मी जे काही सोसलं होतं त्यानंतर माझा हा मार्ग मी निश्चित केला होता. माझ्या मुलीला मी त्यांच्याबरोबर सहज सांभाळू शकले असते. पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर? मी काय केलं असतं? ज्या मुलांना मी सांभाळणार होते, ती मुलं तशीच पाणी पिऊन झोपली असती. पण माझी मुलगी त्यांच्याबरोबर असती तर माझी माया जागृत झाली असती. तिला मी अंधारात नेऊन गुपचूप दोन घास खाऊ घातले नसते का? मला अन्याय करायचा नव्हता. म्हणूनच मी मुलीला दगडूशेठ गणपतीच्या पायाशी घातले आणि पुढे निघाले. माझ्यातली आई चुकली असती तर मग माझ्याच्याने इतर मुलांचा सांभाळ झाला नसता."

आकाशवाणीवर गाऊन माईंना ३५० रु. महिना मिळू लागले. दूरदर्शनवरही त्यांच्या गाण्याचे २ कार्यक्रम झाले, आणि जमा झालेले पैसे घेऊन माई चिखलदर्‍याला परतल्या. एक झोपडी बांधून त्यांनी आपला आश्रम थाटला. हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली. रस्त्यावर सापडलेली, कचराकुंडीत फेकलेली, अनाथ झालेली मुलं माईंनी आपली मानून चिखलदर्‍याला आणली.

त्याचवेळी महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवरील मेळघाटच्या जंगलात व्याघ्र प्रकल्पासाठी स्थाननिश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील ८४ गावांतील आदिवासी निर्वासित होणार होते, आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवासींची बाजू शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कोणीच लक्ष देत नाही, हे पाहून जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयावर २-३ मोर्चेही नेले. तेव्हाचे वनमंत्री छेडीलाल गुप्ता यांच्या कानावर हा प्रकार गेला, आणि त्यांनी आदिवासींचे पुनर्वसन झाल्याशिवाय व्याघ्र प्रकल्प सुरू होणार नाही, असं आश्वासन माईंना दिलं. अजून एक लढाई माई जिंकल्या, पण अशा अनेक लढाया त्यांना रोजच लढाव्या लागत होत्या.

चिखलदर्‍याचा परिसर ख्रिश्चन मिशनर्‍यांनी व्यापला आहे. माईंचं अनाथालय त्यांना त्या परिसरात नको होतं. त्यांनी माईंवर अनेकदा दबाव आणला. 'तुझी मुलं आम्हाला दे, आम्ही तुला पैसे देतो', म्हणून अनेकदा त्यांच्याकडून निरोप आला. मेळघाटच्या जंगलात मजा करायला येणार्‍या राजकारण्यांसाठी बंगल्यावर मुली धाडाण्यास दडपण आणलं गेलं. मात्र ही मुलं हिसकावून घ्यायचा प्रयत्न झाला, तेव्हा माई अक्षरशः चवताळून उठल्या. अमरावतीपासून ते थेट दिल्लीपर्यंत माईंनी तक्रारी केल्या, पण उपयोग शून्य. पण एवढं होऊनही माई चिखलदर्‍यातून पळ काढत नाही, हे पाहून मिशनर्‍यांच्या गुंडांनी माईंवर हल्ला केला. एका महिन्यातच दोन हल्ले झाले. माई तरीही बधल्या नाहीत. मुंबईला निघाल्या असता त्यांच्यावर तिसरा हल्ला झाला, आणि त्यात त्या जबर जखमी झाल्या. त्यानंतर मात्र माईंनी त्या परिसरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

माईंचा पहिला मुलगा दिपक त्यांना पुण्याला सापडला होता. माईंच्या एका मुलाखतीत दिपकचा उल्लेख वाचून सासवडहून कोणी त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत चिखलदर्‍यास आले. दिपकच्या आजोबांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी थोडी जमीन आपल्या बेपत्ता, अनाथ नातवासाठी ठेवली होती. दिपकने आता आपल्या गावी परत जावं, अशी त्या नातेवाईकांची आणि माईंची इच्छा होती. पण दिपकने नकार दिला. माईंनीच त्याला वाढवलं होतं, आणि त्यांना सोडून कुठेही जाण्याची त्याची तयारी नव्हती. मात्र मिशनर्‍यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दिपक, माई आणि अनाथाश्रमातील मुलांसकट चिखलदर्‍यातून बाहेर पडला. आणि कुंभारवळण या सासवडजवळ असलेल्या गावात, आजोबांनी नावे करून दिलेल्या जमिनीवर 'ममता बाल सदन' उभं राहिलं.

आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथाश्रम आहेत. १०४२ मुलं तिथे राहतात. काही वर्षांपूर्वी माई चिखलदर्‍यास परतल्या, आणि तिथे मुलींचं वसतीगृह सुरू केलं. आज १०० मुली तिथे राहून शिक्षण घेतात. माईंना आज सुमारे १५०० मुलं आहेत. दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सगळीच त्यांची मुलं. विधवा, परित्यक्ता, मनोरुग्ण या त्यांच्या लेकी. माईंच्या मुलींचं आडनाव साठे, तर मुलांचं आडनाव सपकाळ असतं. माईंना ४०० सुना आणि २०० जावई आहेत. बरीचशी मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. 'माझी मुलं डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत', हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. मागे एकदा माईंकडे गेलो होतो, तर 'माझी मुलगी M.Phil झाली' असं म्हणून माईंनी पेढे दिले. माईंच्या मुलांची, नातवंडांची लग्नं, बारशी तर नेहमीचीच असतात. शिकून, नोकरीला लागून मुलं दूर गेली, तरी माईंच्या ओढीनं ती परत येतात. माईंशिवाय आयुष्य जगणं, त्यांच्यासाठी संभवत नाही.
याशिवाय वर्धा जिल्ह्यात एक वृद्धाश्रम, गोरक्षण केंद्र आणि परित्यक्तांसाठी चिखलदर्‍याला वसतीगृह माईंनी सुरू केलं आहे. त्या सांगतात,
"सर्वांनी, जन्मदात्या आईनंही पाठ फिरवली तेव्हा गोठ्यातल्या गाईनं मला संरक्षण दिलं. म्हणून मी गायीलाच माझी माय मानलं. तुझ्या ऋणातून उतराई होईन, असं मी तिला वचन दिलंय." वर्ध्याच्या गोरक्षण केंद्राच्या रूपानं माईंनी आपलं वचन पाळलं. आज रस्त्यावर सोडलेल्या भाकड गायींचा, कावळ्यांनी डोळे फोडून जखमी केलेल्या गायींचा सांभाळ या केंद्रात केला जातो. ३० वर्षं राज्यभर हिंडून, भीक मागून, भाषणं करून, कविता म्हणून माईंनी त्यांचा हा संसार उभा केला आहे.

गाण्यानं, कवितेनं माईंना जगवलं, आणि आजही कविताच त्यांचा आधार आहे. बहिणाबाई, सुरेश भटांच्या कवितांचं ऋण त्या मान्य करतात. 'या साहित्यिकांनी मला दु:खातून बाहेर काढलं आणि सांगितलं, व्रण जपत रहा, गात रहा, पुढे जात रहा. साहित्य माणसाच्या पायात बळ देतं, जखमा पुसतं, बेभान करतं, उन्मत्त करतं. कवितांमुळेच माझ्या वेदना मी विसरू शकले', असं माई नेहमी सांगतात. त्या स्वतः उत्तम कवयित्री आहेत. त्यांच्या कवितेतही ही वेदना असते. "वेदनेशिवाय कविता निर्माण होत नसते. वेदनेतून निर्माण झालेली कविता काळजाशी नातं जोडते", माई सांगतात.

माईंनी आता साठी ओलांडली आहे. दिपक आणि ममता ही त्यांची मुलं त्यांचं बरचसं काम आता सांभाळतात. ममताने MSW केलं आहे. 'सख्खी आई जिवंत असताना अनाथाश्रमात नेऊन टाकलं, आणि इतरांच्या मुलांना सांभाळलं', म्हणून आपली मुलगी आपल्याला बोल लावेल, याची माईंना सतत भीती वाटत असे. पण ममताला आपल्या आईने केलेल्या त्यागाचं मोल ठाऊक आहे. माईंनी उभ्या केलेल्या पसार्‍याचा तिला प्रचंड अभिमान आहे.

ममताप्रमाणेच आपल्या इतर मुलींनी शिकावं म्हणून माई झटत असतात. 'स्त्री कधीही हरणार नाही. कारण तिला वेदना म्हणजे काय, ते ठाऊक असतं. विदर्भात इतक्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. पण एकातरी शेतकर्‍याच्या बायकोनं आत्महत्या केल्याचं कधी ऐकलं आहे? ती कधीही या जगातून पळ काढणार नाही. कारण स्त्रीची वेदना तिला जगायला शिकवते. स्त्रीचं आयुष्य कसं? मंदिरात ठेवाल तर नंदादीप, मुठीत धराल तर आग. पण तरीही स्त्रीच कायम वेठीस धरली जाते. रमाबाई, पुतळाबाईंपासून ते रूपकंवरपर्यंत असंख्य स्त्रिया सती गेल्या. समाजात आजवर एक तरी 'सत्या' झाला आहे का?' विलक्षण नाट्यमय आयुष्य जगलेल्या माई 'वेदनांची कीव करून त्यांचा पराजय कसा करायचा', हे असं सहजपणे सांगून जातात. 'चिखल आणि पाण्याचं जे नातं, ते दु:खाचं माझ्याशी आहे. या चिखलातच, म्हणजे ओल्या मातीतच बीज अंकुरतं. पण असा ओलावा मला कधीच मिळाला नाही. मी खडकावरच रुजले. पण म्हणून माझी मुळं पक्की, चिवट आहेत. मी कधीच मोडून पडणार नाही.'

माईंनी केलेल्या संघर्षाची पावती म्हणून त्यांना आजवर १७२ पुरस्कार मिळाले आहेत. पण ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्यासाठी बेघर व्हावं लागलं, त्या पिंपरीमधीच्या गावकर्‍यांनी माईंचं कौतुक केलं, आणि त्यांना आश्चर्यच वाटलं. माईंनी छेडलेल्या आंदोलनामुळेच आज गावकर्‍यांना शेणासाठी महिना हजार रुपये तरी मिळतात. आपल्या गावातील एक स्त्रीने देशात नाव काढलंय, याचा त्या गावकर्‍यांना अभिमान आहे. 'जो गाव माझ्यावर थुंकला, तोच गाव माझ्या नावाने आज जयजयकार करतो. माझं नाव झाल्यावर माझे पतीही माझ्याकडे आले. त्यांना सांभाळणारं कोणीच नव्हतं. मी त्यांना सांगितलं की मी तुमची आई होऊ शकेन, पत्नी मात्र कधीही नाही. पटत असेल तर रहा. माझ्या आश्रमातली मुलं त्यांचा नीट सांभाळ करतात'.

'हे निखारे मी स्वतःहून पदरात बांधून घेतले आहेत. जिवंत असेपर्यंत मी त्यांची राख होऊ देणार नाही,' असं म्हणत न थकता माई काम करत असतात. कसल्यातरी विवंचना सतत असतातच. जिंतूरचे एक डॉक्टर गेल्या महिन्यात माईंकडे एका १० वर्षाच्या मुलाला घेऊन आले. या मुलाच्या हृदयात दोष आहे. डॉक्टरांना तो रस्त्यावर भीक मागताना सापडला. त्यांनी त्याला माईंकडे आणून सोडलं. परवा माईंकडे गेलो तेव्हा या लहानग्याला भेटलो. निलेश त्याचं नाव. अतिशय तल्लख. अफाट स्मरणशक्तीचा धनी. आणि तितकाच समजूतदार. योग्य उपचार झाले नाहीत, तर तो फार जगेल असं डॉक्टरांना वाटत नाही. उपचारांसाठी लाख-दोन लाख रुपये कुठून आणायचे, याच चिंतेत आता माई आहेत.

'मला १७२ पुरस्कार मिळाले. पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही'. म्हणून माई आजही लोकांसमोर पदर पसरतात. चारपैकी एकाच अनाथाश्रमाला सरकारी अनुदान मिळतं. सात-आठशे मुलांच्या खर्चाची तजवीज करताना माईंची दमछाक होते. 'गाना नही तो खाना नही, भाषण नही तो राशन नही', असं म्हणत, आपल्या मुलांना दोन वेळ जेवायला मिळावं म्हणून त्या महाराष्ट्रभर हिंडत असतात.
माईंनी अनाथ मुलं वाढवली, त्यांच्या अनाथपणाची जाणीव न होऊ देता त्यांना वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, जगण्याची प्रेरणा दिली. पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे माईंनी त्या मुलांना या समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. 'निराश्रित', 'बेवारस' असा शिक्का त्यांच्यावर बसू दिला नाही. या मुलांनाही त्याची जाण आहे. आपल्याला जे प्रेम मिळालं, तेच इतरांनाही मिळावं, म्हणून त्यांची धडपड सुरू असते. 'देवा, आम्हांला हसायला शिकव. परंतु आम्ही कधी रडलो होतो, याचा विसर पडू देऊ नकोस', हे माईंनी त्यांना शिकवलं आहे.

मित्र-मैत्रिणीनो माईच्या या कार्याला नक्की मदत करा.....एकदा ममता बाल सदन भेट दयाचं...!!!!

उतरले नव्हते अजून
पाठीवरील शिक्षणाचे ओझे
लहानपणीच संसारात सांगा
मन कसे रमले हिचे ?
हसण्या - खेळण्याच्या दिवसात असे
मातृत्व हे आले
सासरी नांदताना मात्र
बालपण कधीच हरवले
सुखी संसाराचे स्वप्न पहिले
मग मेघ काळे का दाटले.. ?
तुकड्या - तुकड्याने काळीज फाटले
जेव्हा पतीनेही झिडकारले
इवलासा जीव कुशीत घेऊन
भिक मागितली घरदार असून
मरण हि येईना.. थांबे पुढ्यात येऊन
पोटच्या गोळ्याची करून हाक ऐकून
नियतेनीही बघा हिला कशी फिरवली
मातेनेही कशी दूर लोटली?
घरदार , धनी असून देखील
पोरीला या अनाथ केली ...
पोरके झालेल्या लेकरांची
आस हिला लागली
कोठे होती? कोठे गेली?
अनाथांची हि "माई" बनली ....



------------------------------------------------------------------------------------


आश्रमाचा पत्ता -

ममता बाल सदन ,
मु.पो. कुंभारवळण ता. पुरंदर जि. पुणे - ४१२३०१
फोन न- ९५२११५ - २२३०२४
भ्रमणध्वनी - ०९८२२८६१८७२

------------------------------------------------------------------------------------

सिंधुताईचा पत्ता -
सन्मती बाल निकेतन संस्था,
मिनाक्षी बिल्डींग, दुसरा मजला, विहार चौक,
तुपे आळी, हडपसर,
पुणे - २८
फोन नं - ०२० - २६८७०४०३


गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा
झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..
नशिबाची चाकरी करण्यापेक्षा
कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगाव
आयुष्य जास्त सुंदर बनत..

भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा
वर्तमानातल पूर्ण कराव भूतकालातल रंगवून पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

कायमच मागण्या करण्यापेक्षा
कधीतरी काहीतरी देऊन पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..


हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा
मित्राच्या खांद्यावर रडून पहावं
आयुष्य नक्कीच सुंदर वाटत..

चारचौघात एकट बसण्यापेक्षा
कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आपल्याला कोण हवंय यापेक्षा
आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत….

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा : Vijay Gaikwad 



टायटल वाचल्यावर, विषय गंभीर आहे असं वाटतय ना! हम्म... पण विषय गंभीर आहे किंवा नाही यापेक्षा तो कसा समजावून घेतला जातोय हे महत्त्वाचं आहे. मला जे जाणवल, ते फक्त इथे मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.

लहान असताना, एक प्रश्न मला बरयाचदा विचारला जायचा, 'काय मग तू मोठेपणी कोण होणार?' मी फारसा विचार न करता सांगायचे 'मी डॉक्टर होणार.' अस मी का सांगायचे हे मला त्यावेळी सांगता नसते आले. कदाचित 'डॉक्टर' होण हे मला एक प्रतिष्ठेच लक्षण वाटायच. पण मग मला हे समजल कुठून? मोठ्या लोकांच्या गप्पांमधून? अमक्याचा मुलगा डॉक्टर झाला, तमक्याची मुलगी इंजिनिअर झाली. नाव काढल हो पोरांनी.' त्यांना मिळणारा भाव पाहिल्यावर, स्वतःहालाही अशाच भूमिकेत जगासमोर मांडल्यावर आपणही चांगले नाव कमावल्यासारखे होईल अशी माझ्या मनाची समजूत झाली असणार. नक्कीच!


खरच डॉक्टर, इंजिनिअर याच ठराविक वाटा आहेत का चांगल करिअर घडविण्याच्या? इथे मी, या करिअरमधे असणारया किंवा करिअर घडवू पहाणारयांकडे बोट दाखवत नाहीये. तर मला असं म्हणायचय की लहानपणी मूल जेव्हा घडत असतं तेव्हा कुठलीही गोष्ट त्याच्या मनावर बिंबवण्यापेक्षा, त्याच्या मनाचा नैसर्गिक कल जाणून घेऊन त्याप्रमाणे त्याच करिअर घडल तर ते खरया अर्थाने त्याला आयुष्यभर समाधान देत राहील.
'job satisfaction' ही संज्ञा कुठून आली? आज मी कितीतरी मुला-मुलींना पहाते,इंजिनिअरींगची डिग्री घेऊन चांगल्या नावाजलेल्या कंपनीमधे नोकरी करतायत. पगारही चांगला आहे! पण नोकरीमधे समाधानी नाहीत. नोकरीची सुरूवातीची वर्षे नव्या नवलाईमुळ छान वाटतात. पण नंतर जेव्हा जाणवायला लागत की या नोकरीमधे स्वतःचा interest/liking कमी आहे, तेव्हा मन अस्वस्थ व्हायला लागत. मग जाणवत की आपण हे करिअर निवडताना 'मनाचा कौल' घेतलाच नाही. केवळ रूळलेल्या वाटेवरून चालत गेलो. आपण ज्याप्रकारची नोकरी करतोय तिथे आपल्यामधे असलेलं potential/talent पुरेपूर वापरल जात नाहीये. ही जाणिव सतत टोचत रहाते. अशावेळी काहीजण PG करायच ठरवतात. पण यावेळीमात्र निर्णय डोळसपणे घेतला जातो. PG कशात करायच? का करायच, कुठे करायच, माझा interest कशामधे आहे इ. पुन्हा पहिले पाढे गिरवायचे नसतात ना म्हणून!

काहीजण मी असेही पाहिले आहेत, ज्यानी चांगल्या पगाराची/हुद्द्याची नोकरी सोडली. प्रमुख कारण म्हणजे No job satisfaction. आणि नंतर पूर्णवेळ प्रशासकीय सेवेत जाण्याची तयारी सुरू केली. त्यामधे ते यशस्वीसुद्धा झाले. अशाप्रकारे नवीन मार्ग शोधून तिथे आपले बस्तान बसविणारे नक्कीच समाधानी होतात. पण ज्यांना दुसरा मार्ग सापडत नाही किंवा सापडला तरी परिस्थितीमुळे तो मार्ग निवडणे त्यांना शक्य होत नाही त्यांच काय? अस नाही की ते आयुष्यात यशस्वी नसतात. पण जर job satisfaction नसेल तर potential असूनही ते १००% देऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी आयुष्य खूप मेकॅनिकल होऊन जात का? (Rock On मधे फरहान अख्तरने जे character केलय तसं).

काही लोक असतात ज्यांना खूप लवकर समजत की त्यांना आयुष्यात पुढे काय करायचय. पं. भीमसेन जोशी हे असच एक व्यक्तिमत्त्व आहे. किती लहान वयात त्याना समजल होत की 'मला शास्त्रीय संगीत शिकायचय'. त्यावेळी गाण्यात करिअर घडवायच वगैरे असे विचारही त्यांच्या मनात आले नव्हते पण स्वतःची गाण्याची आवड त्याना कळाली होती. आणि पुढे त्यांची घडलेली कारकीर्द आपल्याला माहीत आहेच. अशा व्यक्ती खरच खूप भाग्यवान असतात.

हल्लीची मुले करिअरच्याबाबतीत अगदी चोखंदळ आहेत. दहावी-बारावीची परीक्षा देत असतानाच त्यांचे PG कशात करायच आणि कुठे करायच इथपर्यंतचे planning झालेले असते. पालक आणि मुलांनी करिअर निवडताना संवेदनक्षम राहिल तर पुढे कोमेजणारया/पोळणारया मनांचे प्रमाण नक्कीच कमी होईल.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा : Vijay Gaikwad    


मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर


काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री !

For More Information Visit : Vijay Gaikwad




लहान असताना खूप ऐकले होते कि माणसं बदलतात ,
तेव्हा ते काही कळायचे नाही ,
पण आत्ता मात्र त्या शब्दांचा अर्थ कळू लागलाय ,
नाती किती चिरकालीन असतात हे अत्ता समजुन चुकलय, ...
आयुष्यात हे असंच घडत असतं ,
हे ह्या नात्यांमधूनच शिकायला भेटलयं,
कधी कुणी तरी परकं आपल्या मनात त्याचं घर करून जातं ,
तर कधी कुणी आपल्या खूप जवळचं आपल्याला गरजेनूसार परकं करुन जातं . .
.
.
.
.
.
.
.
.
मग मनात एकच प्रश्न एतो कि का येतात आयुष्यात ही अशी माणसं ??



मला ते दिवस हवे आहेत ... ............... ...
सकाळी सकाळी उठून शाळेत जायचे ...
बाईंचा धडा अन गृहपाठ ..
सरांची छडी अन शाळेचा डब्बा ..
यातच सारा दिवस जायचा ..
मला ते दिवस हवे आहेत ............... ...
दिवसभर चीनचा ,कैर्या पाडत उनाडक्या करायच्या ...
कधी दिवसभर क्रिकेट खेळून हात पाय दुखायचे ..
आई कडे icecrm साठी हत्त करायचा ...
अन बाबांनी तो क्षणात पुरवायचा ...
मला ते दिवस हवे आहेत ............... ...
पावसात नाचायचे अन चिखलात खेळायचे ..
निखळ हसायचे अन मनोसक्त रडायचे ...


मित्रांची निर्मल मैत्री असायची
कदीच ती स्वार्थी नसायची ...
मला ते दिवस हवे आहेत ... ...............
एकत्र खेळण्यात मजा असायची..
मी तू मी भांडण्यात गम्मत असायची
वाढदिवसाला cake आणून पार्टी व्हायची ...
अन मित्रांची ती वाक्य आपली दोस्ती कधी न तुटायची ..
मला ते दिवस हवे आहेत ...
आयुष्य जगण्यात खरा आनंद वाटायचा ,
प्रतेक दिवस नवीन सुख आणायचा ...
माज्या लाडिक बोलण्याचा सर्वाना कौतुक असायचे ..
माज्या हुशारीचे बक्षीस भेटायचे ..
मला ते दिवस हवे आहेत ...
आई बाबा ताई फक्त यांचामध्ये जीवन गुरफटलेले असायचे
प्रेम म्हणजे काय ते फक्त त्यांचा कडून च कळायचे ...


शब्द नाहीत यातील भावना व्यक्त करायला !!!



आयुष्य म्हणजे कटकट
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं
आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं


आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं

आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं

पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.......



Do Read :)

HUMILITY.......the name should be Rajinikanth as well......READ ON....

Raj Bahadur lives a one-room pad in Chamarajpet where the superstar visits him in disguise to meet him and stays with him during his Bangalore sojourns.

Rajnikanth, says Bahadur, is still the same old friend he was during their tenure as driver and conductor in the BTS (Bangalore Transport Service) now BMTC; if anything, their friendship has only deepened even as Rajni kept growing from actor to superstar.

Bahadur says Rajni’s simplicity is evident: ‘When he comes to see me, we drink the same old rum with egg-laced delicacies from my sister who lives one floor below mine. When it is bed time, he sleeps on the floor without any complaints.”

Bahadur says Rajni comes unnoticed to his home in various disguises—from beggar to plumber—and leaves after staying with him for a day or two depending on his mood, often sharing his experiences from the netherworld he inhabits.


Once, Rajni was on a shoot in Rajasthan. The role demanded that he dress up as a beggar. In between shots, Rajni decided to visit a mountain-top temple close by since he is a strong believer. On his way to the temple, a gujarat lady dropped a Rs 10 note into his palms thinking he was a beggar.

After paying obeisance inside the temple, Rajni was on his way out and getting back into his SUV when the lady who had given him ten 10 rupees noticed him again. She ran towards him and apologised and asked for her note back with his autograph.

Rajni refused: “I am sorry. This note is mine now and I am going to keep it for life.” (SAYS , "GOD REMINDS ME WHAT I AM IN FRONT OF HIM AND THAT EVERY ONE IS EQUAL) ♥

This, Bahadur says, Rajni still cherishes as one of his best moments in life as an actor and still carries the Rs 10 in his purse as a remainder that all humans are equal.

For a man who started his job as a bus conductor with a monthly salary of Rs 30 more than 25 years ago, to the star who now gets paid Rs 30 crore per film and yet remain unmoved by all the money is a great feeling. And more so since he is a great friend till death parts us, adds Bahadur with tears in his eyes, which he was unable to stop. :)

Salute to Rajni Sir!



India is a country of festivals, love, peace, enthusiasm and... corruption. However harsh the last word sounds, we as Indians have accepted the reality. But what have we done to counter it? Today one man has rose to the occasion and doing it for all of us. 72 year old social activist Anna Hazare's fast unto death has entered the third day in demand of a stringent anti-corruption bill as a part of the 'India Against Corruption' movement. And its our moral duty to step ahead and support him and tighten the noose around the government to get the common man heard.


                                                              (Courtesy: Internet)
The 'Modern Mahatma' is showing tremendous courage and determination to push through the Lokpal Bill, which will see an independent non-political body being empowered to punish all those guilty of corruption, not even sparing the Prime minister of this country. After 105 years since the real Mahatma introduced Satyagraha in the non-violent fight against the Britishers, here is one man who is using the same principle to fight against even more dangerous culprits than the firangis, our own corrupt politicians. I haven't seen the country explode with such marvelous support across all the age groups and across all the strata of the society in support of this great Gandhian. Right from the media, the celebrities, the sports people to the common office goer, the school teacher, the farmer, college students, all are showing solidarity in unison to this amazing movement of 'India against Corruption'. It only waits to be seen whether Jantar Mantar will turn out to be the Tahrir Square of India if the government does not heed to Anna's demands.

1) Facebook: http://www.facebook.com/IndiACor
2) Twitter :  http://twitter.com/janlokpal

My only appeal to all those who are reading this is to come out and support this movement in your own way. Spread the word. If Anna Hazare can... we all can! Even if we show just 10% of support that we showed towards the Indian cricket team during the Cricket World Cup, we can still win this one. It is so ridiculous how Sonia and Rahul Gandhi sat in the general stands while watching the cricket matches just to show their connect with the common man and when it came to participating the same common man in drafting the revolutionary Lokpal bill, they have ignorantly shut the door on him. People there were as many as 8 instances when the government had fooled us on passing the bill by dissolving the house when it came to clearing the bill. Stand up and say "Not This Time!". Enough is Enough!

Remember...
There is no one Anna Hazare... I am Anna Hazare too, You are Anna Hazare, We all are Anna Hazare!
How long will we let these corrupt politicians drain our nation's resources and demoralize us? It is really pitiful to hear the same politicians who hail from a party based on Gandhian principles calling Anna's satyagraha as 'childish' and 'blackmail'. I have immense respect for our Prime minister but it is very sad to see him heading a cabinet full of corrupt ministers.

Friends and colleagues, we were not lucky enough to experience the euphoria of the great freedom struggle that our great leaders fought 60 years back. But now is the time. Its now or never! The path adopted by Anna may be a very old one, but we all need to believe in him and ourselves. We need to believe in a better tomorrow. In Anna we can see a leader, a selfless one, with no political greed. In him we can see a savior who can take us to the end of this fight against corruption. We need to stand up for ourselves and for our next generation. We cannot doubt each other any more. We have to rise and stand firm. THIS IS THE MOMENT!

Jai hind!